breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘ओला दुष्काळ’ : गृहमंत्री अमित शहा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मदतीसाठी साकडे!
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी
अमित शहा यांचे मदतीचे आश्वासन
नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम ।
अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ३२५ तालुक्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्र सरकारला सादर केला.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच, केंद्र सरकारने तत्काळ मदत करावी, अशी विनंती केली. केंद्र सरकारने सुद्धा निरीक्षणासाठी तत्काळ पथक पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. विमा कंपन्यांसोबत बैठक करून केंद्र सरकारने त्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत. नियम शिथील करून शेतकर्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.