breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

उस्मानाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परंतु नागरिकांकडून आणखीही या उपाययोजनाना योग्य तो प्रतिसाद दिला जात नसून अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिनांक 30 व 31 मे 2020 रोजी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात “जनता कर्फ्यू” चे आदेश दिले असून नागरिकांनी घरामध्ये बसूनच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

या जनता कर्फ्यूच्या दरम्यान दि. 30 व 31 मे 2020 रोजी रुग्णालये, औषधी दुकाने व दूध विक्रीचे दुकाने, हेच चालू राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासाठी फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होईल. बाकीच्या सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये घरातच बसून राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले असून आपण प्रशासनाचा आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही असे जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग बाबत अधिक जागरुक होऊन प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन घरामध्येच कुटुंबियासह थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button