उत्तर भारतात पावसाचा कहर
नवी दिल्ली, उत्तर भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हिमाचल प्रदेशातील चंबामधील रावी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे मोठे नुकसान झाले.
तर नदीशेजारील गावांचा संपर्क तुटला आहे.उत्तराखंडच्या उत्तरेकडील अलकनंदा नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे काम सुरू आहे.जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. झेलम नदीची पाणीपातळी वाढत असल्यामुळे नदीनजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिकडे राजस्थानमधील बिकानेरमध्ये पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर अनेक प्राणी मृतावस्थेत आढळत आहेत. एके ठिकाणी तर माय-लेकींचा मृत्यू झाला. तर झालावाड शहरातल्या बकानी लसूण केंद्रात पावसाने मोठे नुकसान झाले.