breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार…

जुलै महिना उगवला तरी अजून दहावी, बारावीचा निकाल लागला नाहीये. त्यामुळे निकाला बाबत सगळेच संभ्रमात आहे.अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली आहे .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.’बारावीचा निकाल १५ ते २० जुलैच्या दरम्यान लागणार असल्याचं सांगितलं आहे.

ज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मार्च मध्ये झाली. एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. दरम्यान, दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा करोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. याविषयासाठी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार आहेत.सीबीएसई निकालांच्या तारखांची फेक नोटीस व्हायरल झाली होती.

बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात पार पडली. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली होती.दरम्यान, आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल शुक्रवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button