breaking-newsताज्या घडामोडी

“आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक”, अमृता फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना आवाहन

नागपूर | महाईन्यूज

वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेलं आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार अॅसिड हल्ल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक” आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button