breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ;नितेश राणे संतापले

मुंबई – सुप्रीम कोर्टाने नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास स्थगिती दिल्याने ठाकरे सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊले उचलली नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी राजे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, या सरकारनी मराठयांचा विश्वासघात केला, आज आमच्या समाजाच भविष्य अंधारात गेले. कुठल्या तोंडाने या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्याच कशासाठी? आता मूक मोर्चे नाहीच. आता संघर्ष अटळ आहे असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button