आज भारत बंद! दूध, फळ, भाजीपाला मिळणार नाही; केवळ ‘या’ सेवा सुरू राहणार
मुंबई – केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
आज बंददरम्यान चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याने वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात दूध, फळ, भाजीपाला यांचीही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याचा परिणाम सकाळी घरी येणाऱ्या दूधापासून होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासह देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही बंदला पाठिंबा जाहीर केला असून आज समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे फळ व भाजीपाल्याचा पुरवठाही बंद राहणार आहे.
काय बंद असणार?
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या
कांदा, मका, बटाटासह इतर शेत मालाचा लिलाव
राज्यातील बाजार पेठा
दूध, फळे, भाजीपाल्यांचा पुरवठा होणार नाही
कोकणात रिक्षा, टॅक्सी बंद
मुंबईत दुकाने, खासगी संस्था, खासगी कार्यालये बंद राहतील
बाजार समितीच्या सर्व ट्रान्सपोर्ट सेवा बंद राहणार
काय बंद नसणार?
अत्यावश्यक सेवा
मुंबईतील बेस्ट
मुंबईत टॅक्सी, रिक्षा
मुंबईत दूध, भाजीपाला पुरवठा, लग्न समारंभ सुरू राहणार
नवी मुंबईत दूध,औषधाची दुकाने सुरू राहणार
नवी मुंबईत NMMT बस सेवा सुरू राहणार
नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
कल्याण-डोंबिवलीत परिवहन सेवा सुरू राहणार