breaking-newsराष्ट्रिय
आंध्रातील वायएसआर कॉंग्रेसच्या पाच खासदारांचे राजीनामे मंजूर
अमरावती – लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी अखेर आज आंध्रप्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसच्या सर्व पाच खासदारांचे राजीनामे स्वीकारले. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीवरून वायएसआर कॉंग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यातून केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी त्या पक्षाच्या खासदारांनी 6 एप्रिलला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाजन यांनी त्या खासदारांशी दोनवेळा चर्चा केली. मात्र, ते राजीनाम्यावर ठाम राहिले.
अखेर दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर महाजन यांची त्यांचे राजीनामे स्वीकारले. आता विद्यमान लोकसभेच्या मुदतीचा वर्षभरापेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. त्यामुळे राजीनामे मंजूूर झालेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार की नाही ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.