breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आंध्रप्रदेश : चित्तूर येथे बसला अपघात, दोघांचा मृत्यू तर ४० जण जखमी
चित्तूर, आंध्र प्रदेश । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
चित्तूर जिल्ह्यातील चंद्रगिरी मंडळाच्या कासिपेन्टाला गावात एपीएसआरटीसी अमरावती व्हॉल्वो बसला बुधवारी पहाटे झालेल्या धडकेत दोन जण ठार आणि ४० जण जखमी झाले आहेत.
पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. एपीएसआरटीसी बसचा चालक रमेश याला अपघातात प्राण गमवावे लागले आहेत.
चित्तूर पोलिस उपनिरीक्षक म्हणाले की, “या दुर्घटनेत एपीएसआरटीसी बसमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. विजयवाडा ते कुप्पमकडे जाणाऱ्या बसमधील एकाचा मृत्यू झाला. मृतांपैकी एक बस चालक रमेश हा एक आहे. जवळपास ४० जण जखमी झाले आहेत.” जखमींना तिरुपतीच्या रुया रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसला धडक देणारी खासगी बसचा चालकही जखमी झाला. लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.