आंदोलन थांबावा, मराठा आरक्षण मिळेल – नारायण राणे यांचे आवाहन
मुंबई – ”राज्यातील आंदोलन थांबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन आहे. मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन थांबल्यास सरकार यावर तातडीने विचार करेल”, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केली. तसेच ते पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो, मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मध्यस्थी करणार आहे. आंदोलकांनीही तुटेपर्यंत ताणू नये.
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी आरक्षणावर सरकारची भूमिका काय आहे, याची माहिती दिली. ते म्हणाले, मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो. मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मध्यस्थी करणार आहे. आंदोलकांनीही तुटेपर्यंत ताणू नये. तोडफोड, जाळपोळीसारख्या हिंसक आंदोलनामुळे राज्याचेच नुकसान होत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या प्रश्नावर ते म्हणाले, या चर्चेत मी पडणार नाही. माझा विषय मराठा आरक्षणापुरता मर्यादित आहे. इतर कोणत्याही राजकारणात मी पडणार नाही. असेही ते म्हणाले.