breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

असाच वाद कायम राहिला तर मी निवडणूकच लढवणार नाही’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | येत्या 21 मे राजी विधानपरिषदेच्या रिक्त जागेंसाठी निवडणूक होणार आहे. सर्व पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पण, यात आता महाविकास आघाडीमध्ये सहाव्या जागेवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दोन जागांवर अडून बसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. ‘असेच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही’, असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर केली. सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत अलबेल असल्याचे दिसत आहे. आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे 6 उमेदवार आहेत.

विधान परिषदेचे उमेदवार

  • उद्धव ठाकरे – शिवसेना
  • निलम गोऱ्हे – शिवसेना
  • राजेश राठोड – काँग्रेस
  • राजकिशोर मोदी – काँग्रेस
  • रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप
  • गोपीचंद पडळकर – भाजप
  • प्रवीण दटके – भाजप
  • डॉ. अजित गोपछेडे – भाजप
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button