breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावतीत 138 गावांमध्ये पाणीटंचाई, 18 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

अमरावती | एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे पाणीटंचाई आहे. जगायचं कसं, हा मोठा प्रश्न जनतेच्या डोळ्यासमोर आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, तालुक्‍यासह 138 गावांमध्ये पाणीटंचाई असल्या भयाण चित्र आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी 18 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. अमरावतीत पाणी टंचाई निवारण्यासाठी 53 विधन विहिरी तर 90 खाजगी अशा 143 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. तर दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी 10 ते 12 किलोमीटर पायी जाऊन बैलबंडी, ट्रॅक्टर मोटरसायकल च्या माध्यमातून पाणी आणावे लागत आहे. मात्र संबंधित आमदार महोदय याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यातून दिसून येत आहे. जिल्हातील चिखलदरा, धारनी, दर्यापूर, तिवसा, वरुडसह इतर गावात पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. मेळघाट परिसरात चिखलदरा तालुक्यात तर डोंगर चढून पाणी आणावं लागत. या ठिकाणी पाण्याचा टँकर येतो त्यावेळी पाण्यासाठी झुबळ उडते. मे महिन्यात सर्वाधिक तापमान विदर्भात असत. यावर्षी तापमानाने उच्चांक गाठलंय. या काळात प्रशासन जनतेची पाण्याची तहान भागवण्यासाठी काय उपाययोजना करणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button