breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावतीत २८ कोंबड्या अचानक मृत, नागरिकांत बर्ड फ्लूची भिती

अमरावती – देशात बर्ड फ्लूचा फैलाव झालेला असतानाच अमरावतीत २८ कोंबड्या दगावल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही आता बर्ड फ्लूची भिती व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान, या कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्या की इतर आजाराने हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, बर्ड फ्लूचा संसर्ग पाहता नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

वाचा :-नाशिक जिल्हा रुग्णालयाचं दोन वर्ष फायर ऑडिट झालंच नाही

अमरावतीतील बडनेऱ्यात दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण 28 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे म्हटलं जात आहे. अचानक जमिनीवर कोसळून त्या कोंबड्या गतप्राण झाल्या. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निमकर, बाळू ठवकर यांनी बडनेऱ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला याची माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button