breaking-newsआंतरराष्टीय
अफगाणिस्तनमधून भारतात परतले 14 घायाळ शीख परिवार
नवी दिल्ली: अफगाणिस्तानमधून 14 घायाळ शीख परिवार भारतात परत आले आहेत. 1 जुलै रोजी जलालाबाद येथे झालेल्या बॉंबस्फोटात आपले कुटुंबीय गमावलेले, जखमी आणि दु:खीकष्टी 14 शीख परिवार भळभळत्या जखमा घेऊन उपचारासाठ्यी दिल्लीत आले आहेत. हिंदू-शीख समाजातील लोकांचा समुदाय राष्ट्रपती अशरफ गनी यांची भेट घेण्यासाठी जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. झालेल्या आत्मघातकी बोँबस्फोटात 19 जण मरण पावले, तर अनेक जण जखमी झाले. या कुटुंबांवर जणू दु:खाचा पहाडच कोसळला.
या बॉंबस्फोटांमधून बचावलेल्यांपैकी नरेंद्र सिंह खालसा यांनी सांगितले, की ते सारे एखाद्या भयानक स्वप्नासारखे होते. आम्ही जात होतो आणि अचानक बॉम्बस्फोट झाला. अनेक लोक जागेवरच मरण पावले, त्यात शीख नेता-माझे वडील अवतार सिंह खालसा होते. जखमी लोकांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरा बॉंबस्फोट झाला. यात मनमीत सिंह आणि त्याचे वडील दोघेही मरण पावले. या बॉंबस्फोटांमध्ये एकूण 19 जण मरण पावले आहेत.
आता अफगाणिस्तानात राहणे अशक्य झाले आहे, असे बलदेव सिंह यांनी म्हटले आहे.
इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आम्हाला राहू देणार नाहीत. भारतात परत जाणे वा इस्लाम स्वीकारणे हे दोनच पर्याय समोर असल्याचे त्यांनी सांगितले. तर संदीप सिंहसारखे काही अफगाणिस्तानातच राहण्यावर ठाम आहेत. आम्ही अफगाण आहोत, आणि अफगाणिस्तान हा आमचा देश आहे, असे ते सांगतात. 1990 च्या सुमारास यादवी युद्ध सुरू होण्यापूर्वी सुमारे अडीच लाख शीख असलेल्या अफगाणिस्तानात आता जेमतेम 300 शीख शिल्लक् आहेत,