breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अजून किती नीच पातळी गाठणार; धनंजय मुंडेंचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई | महाईन्यूज

ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता सुरक्षा काढली. अजून किती नीच पातळी गाठणार? असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपावर हल्लाबोल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली असून सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी या निर्णयावरून भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटरवरून आपला रोष व्यक्त केला. “ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली… किती नीच पातळी गाठणार? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे… केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध!” अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button