breaking-newsक्रिडा

जयराम उपउपांत्यपूर्व फेरीत

व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत रितुपर्णाचीही दमदार वाटचाल

हो चि मिन्ह : व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि रितुपर्णा दास यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

जयरामने इंडोनेशियाच्या गत्जरा फिकिहिला कुपुला २२-२०, १७-२१, २१-१६ असे पराभूत केले. त्यामुळे जयरामचा पुढील सामना ब्राझीलच्या यगॉर कोएल्हो याच्याशी होणार आहे. कोएल्होने भारताच्या सिरिल वर्माला २२-२०, १७-२१, २१-१७ असे पराभूत केले होते. त्यामुळे कोएल्होला पराभूत करून भारतीय खेळाडूच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता जयरामला मिळणार आहे. त्याशिवाय भारताच्या मिथुन मंजुनाथने जपानच्या रयोतरो मारुओ याला तीन गेमच्या झुंजीनंतर ११-२१, २१-१४, २१-१५ असे पराभूत केले.

महिलांच्या एकेरीत भारताच्या रितुपर्णाने जपानच्या शिओरी सायटो हिला २१-१३, २१-१४ असे पराभूत केले. त्यामुळे तिने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, भारताच्या रसिका राजेला मलेशियाच्या येन मी हो यांनी १६-२१, १३-२१ असे, तर मुग्धा आग्रेला चीनच्या हॅन युईकडून १३-२१, १२-२१ असे पराभूत व्हावे लागले,  तर वैदेही चौधरीला अमेरिकेच्या क्रिस्टल पॅनकडून १४-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे महिलांमध्ये केवळ रितुपर्णाकडूनच आशा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button