breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? राज ठाकरे म्हणाले..

मुंबई : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजेच १७ जुलैपासून सुरू होत आहे. मात्र राष्ट्रवादीतील बंडामुळे सत्ताधारी बिनधास्त आहेत. त्यामुळे आगामी अधिवेशनातून राज्यातील जनतेला काय मिळेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले, राज्यात कुठल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे? त्यांना (सत्ताधारी-विरोधक) जर असं वाटत असेल हे राजकारण आहे तर भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण कुठे जोईल? आपण सगळेजण याचा साधा विचार तरी करतोय का? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ सत्तेचं आणि स्वार्थाचं राजकारण सुरू आहे, हे फार घाणेरडं आहे.

हेही वाचा – अजित पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट; जयंत पाटील यांनी सांगितले कारण

आगामी विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला यावर ते म्हणाले, केवळ घंटा. असं म्हणत राज ठाकरे तिथून निघून गेले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button