TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान; राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील, असे मदान यांनी सांगितले.

  उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल, असेही मदान यांनी सांगितले.

जिल्हानिहाय संख्या

अहमदनगर : २०३, अकोला : २६६, अमरावती : २५७, औरंगाबाद : २१९, बीड : ७०४, भंडारा : ३६३, बुलडाणा : २७९, चंद्रपूर : ५९, धुळे : १२८, गडचिरोली : २७, गोंदिया : ३४८, हिंगोली : ६२, जळगाव : १४०, जालना : २६६, कोल्हापूर : ४७५, लातूर : ३५१, नागपूर : २३७, नंदुरबार : १२३, उस्मानाबाद : १६६, पालघर : ६३, परभणी : १२८, पुणे : २२१, रायगड : २४०, रत्नागिरी : २२२, सांगली : ४५२, सातारा : ३१९, सिंधुदुर्ग : ३२५, सोलापूर : १८९, ठाणे : ४२, वर्धा : ११३, वाशीम : २८७, यवतमाळ : १००, नांदेड : १८१ व नाशिक : १९६.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button