Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

सिंहासन!… महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी असेच काहीसे घडले होते…

मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार अखेर कोसळले. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे संवाद साधत बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना टोलाही लगावला. शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण ५० आमदारांनी बंड केले. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. जवळपास अशीच राजकीय घटना सुमारे ४५ वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटील यांचे सरकार धोक्यात आले होते.

उद्धव ठाकरेंचे सरकार आपल्या पक्षातील आमदारांच्या बंडामुळे कोसळले. अशीच राजकीय घटना जुलै १९७८ मध्ये घडली होती. त्यावेळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ४६ आमदारांनी बंडखोरी केली होती आणि ते काँग्रेस आघाडीतून बाहेर पडले होते. वसंतदादांच्या मंत्रिमंडळातील ४ मंत्र्यांनी त्यावेळी राजीनामे दिले होते. आताच्या राजकीय स्थितीसारखी जवळपास अशीच घटना त्यावेळी घडली होती.

वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधील काँग्रेसच्या चार मत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्याच पक्षातील ३८ आमदारांनी सत्ताधारी आघाडी असलेला पाठिंबा काढून घेतला होता. यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस-इंदिरा काँग्रेस आघाडीचे सरकार धोक्यात आले होते. इंदिरा काँग्रेसबरोबर संबंध ठेवून राज्य चालवणं योग्य वाटत नाही, अशी भूमिका त्यावेळी राजीनामे देणाऱ्या मंत्र्यांनी घेतली होती. या मंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत ३८ आमदार सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडले होते.

महाराष्ट्र टाइम्सच्या अंकाचं पान सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रात १९७८ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली होती. या राजकीय घडामोडीची साक्ष देणारं महाराष्ट्र टाइम्सच्या अंकाचं पान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे १३ जुलै १९७८ च्या अंकाचे पहिले पान व्हायरल होत आहे. यात महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांचे राजीनामे अशा शीर्षकाखाली वृत्त देण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button