Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चालकाचं नियंत्रण सुटलं, मजुरांना नेणारा पिकअप रस्त्याच्या कडेला उलटला; ४३ जण जखमी
- शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या पिखअपता अपघात
- ४३ शेतमजूर जखमी, सुदैवाने जिवीतहानी नाही
- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील घटना
चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजुरांना गोंदेडा -खांबाळा मार्गावरील मनोज वाघे यांच्या शेताकडे घेऊन जात असाताना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन वाहन उलटले. या वाहनात ४३ मजूर होते. अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजुर धावून गेले व वाहनाखाली दाबल्या गेलेल्या जखमींना त्यांनी बाहेर काढलं. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे घेऊन जाण्यात आले आहे. या अपघातात १९ शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर २४ शेतमजूर किरकोळ जखमी झाले आहेत.