संजय राऊतांच्या एकाच वेळी दोन भूमिका, विधानसभेत बहुमत सिद्ध करु ते मविआतून सोडण्याची तयारी
मुंबई :शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उस्मानाबादमधील आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दोन वेगळ्या भूमिका मांडल्या. सुरुवातीला संजय राऊत यांनी हा संघर्ष पोहोचल्यास महाविकास आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावात विजयी होईल, असं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावर पुन्हा परतील हा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कैलास पाटील आणि नितीन देशमुख बोलल्यानंतर संजय राऊत यांनी गुवाहाटीमधील आमदारांना एक आवाहन केलं. मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव मांडा, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करु, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथं नसले तरी शिवसैनिक ठाण मांडून बसला आहे. कारण, आपल्या सगळ्यांना उद्धव ठाकरे इथं येतील हा विश्वास आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय संकट आहे. मुंबईतून कोण कुठं गेलेय या बातम्या पाहत आहोत. मुंबईतून सूरतला कोण गेलं, गुवाहाटीला कोण गेलं आणि गोव्याला गेलं या बातम्या पाहिल्या. कैलास पाटील सुरत आणि गुवाहाटीमधून नितीन देशमुख परतले आहेत. शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण भाजपनं केल्याचा दावा संजय राऊत यांनी केलं. राजकारणानं किती खालची पातळी गाठली आहे. कैलास पाटील, नितीन देशमुख इथं आहेत. त्यांच्या ताब्यातील २१ आमदारांचा संपर्क झालेला आहे. ते आमदार मुंबईत येतील त्यावेळी हे आमदार शिवसेनेचे असतील, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभेत संघर्ष पोहोचल्यास विजय महाविकास आघाडीचा असेल, असं संजय राऊत म्हणाले.
आता या क्षणी ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. या सर्व आमदारांची इच्छा महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावं मुंबईत यावं. आमदारांनी त्यांची मागणी शिवसेना प्रमुखांना सांगावी. मोबाईल, व्हाटसअपवरुन आणि ट्विटरवरुन सांगत आहात. शिवसैनिक असल्याचं सागंताय, शिवसेना सोडणार नाही, असं सांगताय तुमची भूमिका सरकारविषयी आहे असं सांगताय. तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर या बोला. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबद्दल विचार करु, मात्र, मुंबईत या असं संजय राऊत म्हणाले.