Uncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला

मुंबई: महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप करण्याचा आरोप असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसत आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांनी भाजपवर निशाणा साधला. बाळासाहेब थोरात गुरुवारी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. सागर बंगला  कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल, असे म्हणत थोरातांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.

सध्या राज्यात जे घटतंय ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही. त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र येऊन याचा विरोध करावा लागेल. अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केले.फोन टॅपिंग लोकशाहीसाठी घातक: बच्चू कडू

रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याविषयी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना विचारणा करण्यात आली. यावर बच्चू कडू यांनी म्हटले की, माझा फोन टॅप झाल्याचे उघड झाले होते. ही गोष्ट मला चुकीची वाटते. गांजा तस्करीचे कारण पुढे करून माझा फोन टॅप झाल्याचे निष्पन्न झाले होते. असे घडत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

रश्मी शुक्लांचं पोस्टिंग महाराष्ट्रात होणार?
फोन टॅपिंग प्रकरणाची सध्या न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. गुरुवारी म्हणजे आज सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे. त्याच्या एक दिवस आधीच रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची सध्या न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. गुरुवारी म्हणजे आज सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे. त्याच्या एक दिवस आधीच रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button