breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाविकास आघाडीचे सरकार सुरक्षित : शरद पवार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत  अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलेसे करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. पण राज्यसभा जरी हरलो असलो तरी राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही”, असं ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नि:क्षून सांगितलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. ऐन निवडणूक काळात फडणवीसांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनी शांततेच्या काळात अधिकचा घाम गाळला, त्याचं फळ भाजपला तिसऱ्या जागेच्या विजयी रुपात मिळालं. फडणवीसांनी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना चितपट केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झालं आहे. त्याची झलक विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळेल, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. याच चर्चांवर पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या.

शरद पवार म्हणाले, “तिन्ही पक्षांना मिळालेली मतं लक्षात घेतली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवंय त्यात काहीही धोका नाहीये. आमचं एकही मत फुटलेलं नाही. त्यामुळे राज्यसभा जरी हरलो असलो तरी राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही. उलट आम्हालाच (प्रफुल्ल पटले) भाजपच्या गोटातून एक मत मिळालंय”

राजकारणात रिस्क घ्यावी लागते, उद्धव ठाकरेंनी ती रिस्क घेतली

“राजकारणात रिस्क घ्यावीच लागते, जी उद्धव ठाकरेंनी घेतली. अतिशय कमी मतं असतानाही त्यांनी ही जागा लढवली आणि ती जवळपास ३३ मतांपर्यंत आणली. शिवसेनेच्या आमदाराचं मत का बाद झालं मला माहित नाही. त्यांनी काय केलं मला माहित नाही, पण इतर तिघांसंबंधी जो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे तो योग्य आहे”, असंही पवार म्हणाले.

पवारांकडून फडणवीसांचं कौतुक
“अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलेसे करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. त्यांची रणनिती त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली”, अशा शब्दात पवारांनी देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button