‘पाकिस्तानी सैन्य भारताशी युद्ध करण्यास सक्षम नाहीत’
बाजवा यांना काश्मीरबाबत हवा होता करार - पाक पत्रकाराच्या खुलाशांनी उडाली खळबळ
कराची- जेव्हा-जेव्हा पाकिस्तानी लष्कराची भारतीय लष्कराशी चकमक झाली, तेव्हा त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. फाळणीनंतर पाकिस्तान भारताला फक्त चकवा देत आला आहे. कारण माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) कमर जावेद बाजवा यांनी सत्य सांगितले की, पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा सामना करण्यास सक्षम नाही.
हा खुलासा पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी एका मुलाखतीत केला आहे. बाजवा यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी एनएसए अजित डोवाल यांच्याशी चर्चा केल्याचेही मीरने सांगितले आहे. हमीद मीर यांनी ब्रिटनस्थित पाकिस्तानी मीडिया UK44 ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की बाजवा यांनी दोन वरिष्ठ पत्रकारांना सांगितले होते की भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडे रणगाडे भरण्यासाठी दारूगोळा किंवा डिझेल नाही.
आमच्याकडे तोफांच्या हालचालीसाठीही डिझेल नाही–बाजवा
त्यांनी बाजवा यांचा हवाला देत सांगितले की, कमांडरच्या बैठकीत बाजवा म्हणाले होते की, पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्याशी मुकाबला करू शकत नाही. तोफांच्या हालचालीसाठीही आमच्याकडे डिझेल नाही, असे ते म्हणाले होते. मीर म्हणाले की, बाजवा यांनी भारताशी संबंध सुधारण्याचा प्रस्तावही ठेवला होता. काश्मीरच्या तोडग्यावरही ते काम करत होते.
मीर म्हणाले की, बाजवा यांनी 2021 मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी गुप्त चर्चा केल्याचा खुलासा केला होता आणि युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा नियोजित होता. बाजवा यांनी काश्मीरबाबत करार केला होता, जो त्यांनी पाकिस्तानी लोकांना कधीच सांगितलेला नाही, असा दावाही मीर यांनी केला.
इमरानला पंतप्रधान मोदींच्या भेटीची माहिती नव्हती
मीर यांनी सांगितले की, भारतासोबतच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला जावे लागले. परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती मिळताच ते तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे गेले. पण त्यालाही याची माहिती नव्हती. त्यानंतर इम्रान म्हणाले होते की, मला माहिती आहे की NSA अजित डोवाल यांच्याशी चर्चा सुरू आहे, पण पीएम मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत कोणतीही माहिती नाही.