breaking-newsTOP NewsUncategorizedराजकारणराष्ट्रिय

रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटताना जळगावात मोठी दुर्घटना; गिरणा नदीपात्रातून ४ तरुण-तरुणी वाहून गेल्या

जळगाव । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शहराजवळ गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यावर सहलीसाठी गेलेल्या चार तरुण-तरुणी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चार जणांपैकी तीन जणांना वाचवण्यात नागरिकांना यश आला असून एक जण नदीत वाहून बेपत्ता झाला आहे. सध्या त्याचा शोध सुरू आहे. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. समिक्षा विपीन शिरडुकर (वय १७), योगिता दामू पाटील (वय २०) आणि सागर दामू पाटील (वय २४) या तिघांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, तर नयन योगेश निंबाळकर (वय १४) याचा शोध अद्याप सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर परिसरातील दूध फेडरेशन जवळ मिथिला अपार्टमेंटमधील १० ते १५ मुले कांताई बंधारा नागाई- जोगाई मंदिर परिसरात रविवारची सुट्टी असल्याने सहलीसाठी गेली होती. यादरम्यान गिरणा नदीपात्रात पाण्याचा आनंद लुटत असताना मुसळधार पावसामुळे अचानक पाणी वाढले. यावेळी एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. त्यानंतर एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. यावेळी सोबतच्या इतर मुलांनी समिक्षा विपीन शिरडुकर, योगिता दामू पाटील आणि सागर दामू पाटील या तिघांना ओढून पाण्यातून बाहेर काढले. तर नयन हा हाती लागला नाही. पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. वाचविण्यात आलेल्या तिन्ही मुलांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button