breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
सर्वप्रथम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टिव्हीवर लस घ्यावी, ‘या’ नेत्याची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबवला जाणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र त्याआधी अनेक राजकीय नेत्यांकडून सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील सर्वात प्रथम पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लस टोचून घ्यावी, अशी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केले की, कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. पण या लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे सर्वप्रथम पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर ही लस टोचून घ्यावी. त्यानंतर मी ती स्वतः घ्यायला तयार आहे. यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल.