वाहनचालक घाबरू नका! आता फास्टॅग ‘या’ तारखेपर्यंत लावता येणार
केंद्र सरकारने नवीन वर्षात 1 जानेवारीपासून टोलनाक्यावर संपूर्ण टोल वसुली फास्टॅगद्वारेच केली जाणार असे जाहीर केले. वाहनचालकांना फास्टॅग लावण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत दिली होती. परंतु वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने ही मुदत वाढवली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घोषणा केली होती की, “1 जानेवारी 2021 पासून देशाचे सर्व राष्ट्रीय मार्गांवरील टोलनाके कॅशऐवजी फास्टॅग लेनमध्ये रुपांतरीत होती. जर एखादा वाहनचालक फास्टॅगशिवाय टोलनाक्यावर आला तर त्याला दुप्पट टोल द्यावा लागेल.” परंतु आता फास्टॅग घेण्यासाठी आणि लावण्यासाठी वाहनचालकांना दीड महिन्यांची मुदत मिळाली आहे.
वाचाः आजपासून एका मिनिटात 10 हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य
सध्या फास्टॅगद्वारे टोलनाक्यावरील वसुली 75 ते 80 टक्के आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून सल्ला दिला आहे की,त्यांनी 100 टक्के कॅशलेस टोल वसुलीसाठी आवश्यक मंजुरी घेऊन ते 15 फेब्रुवारीपासून लागू करावं.