‘मुंबई सेंट्रल’चं नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक
सध्या शहरांच्या नामांतर करण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहे. यातच मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरु केल्याचं दिूसन येत आहे. त्याबाबतीतच पत्रं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे.
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलून नाना शंकरशेठ टर्मिनस करावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेनेकडून होणाऱ्या पाठपुराव्याला यश मिळत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पत्र लिहिलं आहे. नामांतराबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त झाला असून, केंद्र सरकार याबाबत कार्यवाही करत असल्याची माहिती त्यांनी सावंत यांना दिली आहे. यापूर्वी मुंबई सेंट्रलचं नाव नाना शंकरशेठ टर्मिनस करण्याबाबतचा ठरावर विधानसभेतही पारित झाला आहे.
जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दल
जगन्नाथ शंकरशेठ हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, तसंच एक उद्योगपती होती. ते थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी आणि आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक होते. त्याचबरोबर पहिल्या रेल्वेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.