breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘देशाच्या फाळणीसाठी ‘हेच’ जबाबदार’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
महात्मा गांधींच्या चुकीमुळेच 1947 ला देशाची फाळणी झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना रामेश्वर शर्मा यांनी फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार धरले आहे.
ते भोपाळमध्ये एका सभेत बोलत होते. रामेश्वर शर्मा हे मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आहेत.
रामश्वेवर शर्मा म्हणाले की, दिग्विजय सिंह यांचे काम आणि व्यवहार जिनापेक्षा जास्त धोकादायक आहे. आधी जिनाने देशाचे विभाजन केले. 1947 मध्ये बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले. तसेच विभाजन दिग्विजय सिंह करत आहेत, असे शर्मा यांनी म्हटले आहे.
रामेश्वर शर्मा याआधीही अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहेत.