…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्यांना पाहिजे तोपर्यंत अध्यक्ष राहतील. मात्र, त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीच पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. या देशाला सर्वांना पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हवं आहे आणि ते राहुल गांधीच देऊ शकतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे. फक्त पक्षालाच नाही, तर देशाला देखील राहुल गांधी यांची गरज भासत आहे. या देशाला एक सर्वांना पुढे घेऊन जाईल असं समर्थ पुरोगामी नेतृत्व हवं आहे अन ते राहुल गांधीच देऊ शकतात.”