…तर देशाचं वाटोळं लावेल, निलेश राणेंचा शिवसेनेला टोला
![Nilesh Rane critisize Shivsena Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/sanjay-raut-Nilesh-Rane.jpg)
मुंबई: उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही, असा टोला भाजपाचे नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवले आहे. तसेच आमचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षाला असला तरी राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच पक्षातून पक्षांतर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या या विधानानंतर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही. कुबड्यांवर सरकार चालत आहे. तसेच उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर, फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं करेल, असा घणाघाती टीका निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार हतबल झाले. ५० वर्षांत इतके हतबल सरकार कधीही दिसले नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे.