Breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चांगले काम केल्यास समाज दखल घेतो – उद्योगमंत्री सुभाष देसाई

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  चांगले काम केल्यास समाज त्याची दखल घेतो. समाजात गुणवंत वाढविण्यासाठी, समाजाची सेवा करणा-या गुणी जणांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक करणे गरजेचे आहे, असे मत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. 

भोसरीतील अकुंशराव लांडगे सभागृहात आज (बुधवारी) उध्दवश्री पुरस्कार सोहळा समितीच्या वतीने उध्दवश्री पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमाला खासदार  श्रीरंग बारणे, शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक,  पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राज्य संघटक व जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,  शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे,  नगरसेवक प्रमोद कुटे, पुरस्कार समितीचे अध्यक्ष माधव मुळे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व पुरस्कार समितीचे निमंत्रक कामगार नेते इरफान सय्यद, सचिव गुलाब गरुड आदी उपस्थित होते.

उध्दवश्री पुरस्काराने बाळासाहेब लांडगे (क्रीडा), गोपाळ देवांग (क्रीडा), संजय नहार (सामाजिक), राजन खान (साहित्यिक), प्रभाकर ओव्हाळ (ज्येष्ठ साहित्यिक), दिप्ती चंद्रचुड (औद्योगिक), भाऊसाहेब क-हाडे (कला), डॉ. पंकज बोहरा (वैद्यकीय), देवदत्त कशाळीकर (छायाचित्रकार), एम. ए. हुसेन (सामाजिक), राहुल धोत्रे (क्रीडा), कैलास पुरी (वार्ताहर), भूषण तोष्णीवाल (अंध सनदी लेखापाल), डी. एम. खुणे (सनदी लेखपाल), गोविंद दाभाडे (सरस्वती शिक्षण मंडळ, संस्थापक), मिलींद शिंदे (गायक), किशोर ढोकळे (कामगार नेते), बबनराव कांबळे (दै. सम्राट संपादक) आदींचा गौरव करण्यात आला. दिवंगत जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ यांच्या नावाने 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button