breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
कृषी कायद्याचे समर्थन करण्याऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा आहे का? राहुल गांधींचा प्रश्न
![Congress leader Rahul Gandhi quetioned about committee members](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/rahul-gandhi.jpg)
दिल्लीत कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला तुर्तास स्थगिती दिली आहे. न्यायलयाने यावर तोडगा काढण्यासाठी 4 सदस्यीय समितीची देखील स्थापना केली आहे. मात्र समितीमधील चारही सदस्य कृषी कायद्याचे समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी कृषीविरोधी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? असा प्रश्न विचारला आहे.
हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे रद्द होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील राहुल गांधींनी मोदी सरकारला दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका देत तीनही कृषी कायद्यांना न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढचा आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.