पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचे धोनीबाबत मोठं विधान; म्हणाला..
![Wasim Akram said that RCB would have won the IPL three times if Dhoni was the captain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/wasim-akram-780x470.jpg)
IPL 2023 : आयपीएलचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या दरम्यान पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अकरमने चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं विधान केलं आहे. त्याच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
वसीम अकरम म्हणाला की, महेंद्र सिंह धोनी जर आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगुळुरूचा कर्णधार असता तर त्याने आत्तापर्यंत बंगळूरूला तीनदा आयपीएल जिंकून दिली असती. आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगुळुरू ही टीम मला सर्वात जास्त आवडते. या संघाने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही आहे. बंगुळुरू तीनदा आयपीएलचा फायनल सामना खेळली आहे, मात्र तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा समाना करावा लागला आहे.
हेही पाहा – Law of Love चा Action Packed ट्रेलर प्रदर्शित
आरसीबीकडे विराट कोहली सारखा सर्वोत्कृष्ठ खेळाडू आहे. पण तरीही त्यांना एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. धोनी असतात तर ते आतापर्यंत जिंकले असते. विराट कोहली कुठे मागे पडला हे मला माहीत नाही. तो खूप मेहनत मुलगा आहे. कदाचित तो भारतीय क्रिकेटकडे जास्त लक्ष देत आसेल आणि आयपीएलमधील कर्णधारपद कधी कधी तुमच्यासाठी ओझे ठरते. म्हणूनच ते तिथे आहे ते चांगले आहे. तो उत्तम काम करत असून खेळाचा आनंद लुटताना दिसत आहे, असं वसीम आकरम म्हणाला.