भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; १०७ धावांनी दणदणीत विजय
![Wash of Pakistan from India; A resounding victory by 107 runs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IND-vs-PAK-Womens-World-Cup.jpeg)
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला धोबीपछाड केले आहे. 107 धावांनी भारताने पाकिस्तानवर दणदणित विजय मिळवला असून भारताने पाकिस्तानला 245 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, पाकिस्तानी संघाला ते पेलता आलेलं नाही. पाकिस्तानी संघ 137 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने तुफान गोलंदाजी करत हा सामना खिशात घातला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. वैशाली शर्मा खाते न उघडताच बाद झाली. मात्र, त्यानंतर स्मृती मंधाना, स्नेह राणा आणि नवोदित पूजा वस्त्राकरच्या अर्धशतकी खेळीने भारताचे सामन्यात पुनरामगन झाले. त्यामुळे टीम इंडियाला 244 धावसंख्या गाठता आली. पाकिस्ताननेही सामन्यात खराब सुरुवात केली. राजेश्वरी गायकवाडने अवघ्या 11 धावांवर जव्हेरिया खानला बाद केले. या सामन्यात राजेश्वरी गायकवाडने तुफान गोलंदाजी केली, ज्यामुळे भारताला चार विकेट घेता आल्या. 47 ओव्हरमध्ये पाकिस्तानी संघाचं आव्हान संपुष्टात आलं.