भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव
मुंबई – भारत आणि न्युझीलंडमधील अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटचा पहिल्या विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने भारताला 8 गड्यांनी पराभूत केलं आहे. कर्णधार केन विल्यमन्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
भारताची फलंदाजी दुसऱ्या डावातही पुर्णपणे ढेपाळली. यामध्ये सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल पाचव्याच दिवशी बाद झाले होते. सहाव्या दिवशी खेळताना विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. यष्टीरक्षक रिषभ पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार मारले. मात्र त्याला योग्य साथ मिळाली नाही आणि मोठी भागीदारीही झाली नाही.
न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने 3 काईल जेमिसनने 2 आणि नील वॅग्नरने 1 विकेट घेतल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी न्युझीलंडच्या 10 गड्यांना बाद करावं लागणार आहे.
दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीयांना न्यूझीलंडची सलामीची जोडी लवकर फुटली नाही. मात्र आर. आश्विवनने दोन गडी बाद करत संघाला पुनरागमनाची आशा जिवंत केली. मात्र टेलर आणि केनने यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.