मुंबईच्या प्रशिक्षकांची रोहितने केली बोलती बंद
मार्क बाऊचर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक
![Mumbai's coaches, Rohit, in two words, stopped talking, Mark Boucher, Mumbai Indians, coach,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/rohit-1-780x470.jpg)
मुंबई : आयपीएलचा शेवटचा सामना खेळल्यानंतर मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांना रोहित शर्माबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बाऊचरने आपले आणि रोहितचे काय बोलणे झाले हे सांगितले. हे सर्व ऐकल्यावर रोहितने फक्त दोन शब्दांतच बाऊचर यांची बोलती बंद केल्याचे समोर आले आहे.
सामन्यानंतर बाउचर यांनी पत्रकार परिषदेत रोहित बद्दल विचारल्यावर सांगितले, “मला वाटते की तो स्वत: निर्णय घेण्यास सक्षम आहे. पुढच्या मोसमात मोठा लिलाव आहे, काय होईल याचा अंदाज कोणालाच नाही. तसेच रोहितसोबतच्या चर्चेबद्दल तो म्हणाला, ‘मी रोहितशी बोललो. आम्ही यंदाच्या हंगामाचा आढावा घेतला, आणि मी त्याला विचारलं पुढे काय करायचे ठरवलयं? असा प्रश्न ही केला त्यावर रोहितचे एकच उत्तर होते ते म्हणजे, वर्ल्ड कप. त्याचे हे उत्तर ऐकून बाउचरची बोलतीच बंद झाली.
यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. व्यवस्थापनाच्या या निर्णयात मार्क बाउचर यांचाही मोलाचा वाटा होता. बाउचर हा हार्दिकचा चांगला मित्र असून त्यांची मैत्री अनेकदा पाहायला मिळाली आहे त्यामुळे हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळचे मित्र असल्याचे मानले जाते. यामुळे रोहितने वर्ल्ड कप म्हणून दिलेल्या उत्तराने हार्दिकच्या या मित्राला मिरची तर झोंबली नाही ना असा प्रश्न उभा राहतो.
आयपीएलमध्ये अत्यंत खराब कामगिरी करत मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतू बाहेर पडली. गुणतालिकेत तळाशीच मुक्काम गाठला असून मुंबईने शुक्रवारी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांचासाठी योग्य ठरला नाही. लखनौचा सलामीवीर केएल राहुलने (४१ चेडूंत ५५ धावा) तर ३ फलंदाज बाद झाल्यावर निकलस पूरनने मैदानावर आगमन करत २९ चेंडूत ७५ धावांची प्रभावी खेळी केली. त्यामुळे लखनौला मुंबईपुढे २१४ धावांचे आव्हानात्मक लक्ष उभे केले. लक्षाचा पाठलाग करत मुंबईकडून रोहित शर्माने दमदार अर्धशतक करत ३८ चेंडूत प्रभावी ६८ धावा केल्या. २२१.४३ च्या सरासरी रन रेटने नमन धीरने ही २८ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी साकारली मात्र तरीही संघाला लक्ष गाठता आले नसल्यामुळे मुंबईला हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पराभव पत्करावा लागला.