भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएल स्थगित; BCCI चा मोठा निर्णय!

IPL 2025 | भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
आयपीएलचे एकूण १६ सामने शिल्लक होते. हे १६ सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा : मोरया शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
पाकिस्तानकडून ८ तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे PSL चे सामने रद्द केले होते. आता PSL चे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहे.