#INDvsAUS:भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Capture-12334.jpg)
अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीमुळे भारताने ६ गडी बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी स्टार्क आणि कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर भारताचे शेवटचे ४ फलंदाज २५ चेंडूत अवघ्या ११ धावा काढून माघारी परतले. त्यामुळे भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला आहे.
आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची ६ बाद २३३ वरुन सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्याच सत्रात कमिन्सने रविचंद्रन आश्विनला टीम पेनकरवी झेलबाद करत माघारी धाडलं. मग ठराविक अंतराने भारताचे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरीस कमिन्सने शमीला बाद करत २४४ धावांवर भारताचा पहिला डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४, पॅट कमिन्सने ३ तर हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी घेतला.