अर्जुन तेंडुलकरसह चार खेळाडूंचा हार्दिकने केला गेम
मुंबई इंडियन्सच्या संघात नेमंक चाललंय तरी काय
मुंबई : अर्जुन तेंडुलकरसह चार खेळाडूंचा हार्दिक पंड्याने चांगलाच गेम केल्याचे आता समोर येत आहे. एकिकडे हार्दिकला ट्रोल केले जात आहे. हार्दिकची तक्रार रोहित शर्मासह काही खेळाडूंनी केली आहे. पण दुसरीकडे हार्दिकचे मात्र संगातील वागणे मात्र चांगले नसल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात नेमंक चाललंय तरी काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
या आयपीएमलधून बाहेर पडणारा पहिला संघ हा मुंबई इंडियन्स ठरला होता. मुंबईच्या संघावर नामुष्की ओढवली असली तरी हार्दिक मात्र पार्टीमध्ये मस्ती करत असल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकला कर्णधाजरपदाचे गांभीर्य नसल्याचे आता समोर येत आहे. हार्दिकने रोहित शर्मापासून लसिथ मलिंगापर्यंत आजी-माजी खेळाडूंचा अपमान केला आहे. पण आता त्याने संघातील युवा खेळाडूंनाही सोडलेले नाही.
टी-२० हा युवा खेळाडूंचा खेळ असल्याचे समजले जाते. मुंबई इंडियन्सच्या संघात अर्जुन तेंडुलकरसह बरेच युवा खेळाडू आहेत. यामध्ये कुमार कार्तिकेय, विष्णू विनोद, शिवालिक शर्मा, हार्विक देसाईसारख्या युवा खेळाडूंचा समावेश आहे. या युवा खेळाडूंना जेव्हा अनुभव मिळेल, तेवढेच त्यांच्यासाठी महत्वाचे असते. कारण नेट्समध्ये सराव करून सामन्यांचा अनुभव मिळवता येऊ शकत नाही. त्यामुळे या युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे असते. यापूर्वी जेव्हा रोहित शर्मा कर्णधार होता, तेव्हा रोहितने युवा खेळाडूंना संधी दिली होती. रोहितने या युवा खेळाडूंसाठी एक व्यासपीठ निर्माण केले होते. पण हार्दिकने मात्र या युवा खेळाडूंना एकही संधी दिलेली नाही. त्यामुळेच त्याच्यावर संघातील युवा खेळाडूही नाराज असल्याचे म्हटले जात आहे. कारण त्यांना आयपीएल संपत अली असली तरी एकही संधी मिळालेली नाही.
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या बाहेर पडली आहे. त्यामुळे गेल्या सामन्यात हार्दिकला या युवा खेळाडूंपैकी काही जणांना संधी देता आली असती. पण हार्दिकने या युवा खेळाडूंना संधी दिली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये तर हार्दिक या युवा खेळाडूंचाही गेम करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण या खेळाडूंचे एक वर्ष आता वाया गेले आहे.