५ महिने १० सामने, भारतीय संघाची ‘कसोटी’; WTC फायनलसाठी ‘या’ ३ संघांचं आव्हान
WTC Final | भारतीय संघ पुढील ५ महिन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात १११ दिवसांमध्ये एकूण १० कसोटी सामने खेळणार आहे. भारतासमोर बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. भारतीय संघाला टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या गदेने २ वेळा हुलकावणी दिली आहे. टीम इंडियाचा २०२१ साली न्यूझीलंड तर २००३ मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभव केला.
भारतीय संघ बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध २, न्यूझीलंड विरुद्ध ३ तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहे.
भारत-बांगलादेश कसोटी मालिका
पहिला सामना : १९-२३ सप्टेंबर, चेन्नई
दुसरा सामना : २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, कानपूर
हेही वाचा – भोसरीतील कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी ‘स्पेशल गिफ्ट’
भारत न्यूझीलंड टेस्ट सीरिज
पहिला सामना : १६-२० ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा सामना : २४- २८ ऑक्टोबर, पुणे
तिसरा सामना : १-५ नोव्हेंबर, मुंबई
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (वि. ऑस्ट्रेलिया)
पहिला सामना : २२-२६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरा सामना : ६-१० डिसेंबर, एडलेड
तिसरा सामना : १४-१८ डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथा सामना : २६-३० डिसेंबर, मेलबर्न
पाचवा सामना : ३-७ जानेवारी २०२५, सिडनी.