हैदराबाद बलात्कार प्रकरण: असं केल्याने बलात्कार थांबतील का?; – ज्वाला गुट्टाचा
महाईन्यूज |
हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ठार करण्यात आले. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी ठार झाले. या चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिलता, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झालेले आहेत.
बहुचर्चित प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली गेलीआहे. त्यानंतर बहुतांश लोकांनी या कृत्याचे समर्थन केले, तर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने या एन्काऊंटरनंतर प्रश्न उपस्थित केला आहे. “असे केल्याने भविष्यात बलात्काऱ्यांना आळा बसेल का? आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समाजातील प्रतिष्ठेचा विचार न करता सगळ्या बलात्काऱ्यांना समान शिक्षा देणार का??”, असे सवाल तिने विचारला आहे.