पाकिस्तानच्या क्रिकेट संघातल्या अन्यायामुळे ‘त्या’ हिंदू खेळाडूला स्विकारावा लागला मुस्लीम धर्म
मुंबई | महाईन्यूज|
खेळाडूची गुणवत्ता पाहायची असते की जात, हा प्रश्न सध्याच्या घडीला ऐरणीवर आला आहे. कारण याच संदर्भातील एक मोठा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस अशा नावाने ओळखला जाणारा शोएब अख्तरने केला आहे.
सध्या भारतामध्ये नागरीकत्वाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जर अन्य देशांतील भारतीय लोकांवर अन्याय केला जात असेल, तर काय करायचे याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारतामध्ये जसे मुस्लीम धर्माचे लोकं राहतात तसेच पाकिस्तानमध्ये काही हिंदूदेखील राहत आहेत. पण पाकिस्तानमधील हिंदू लोकांवर कायम अन्याय केला जातो, असे म्हटले जाते. आणि याचचं एक उदाहरण म्हणजे पाकिस्तानच्या क्रिकेट संघातल्या एका हिंदू खेळाडूंवर केला गेलेला अन्याय.
अख्तरने ‘गेम ऑन है’ या टीव्ही शो मध्ये याबाबतचा बेधडकपणे खुलासा केला. यावेळी पाकिस्तानचे काही माजी क्रिकेटपटूही कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अख्तर म्हणाला की, ” पाकिस्तानच्या संघात बरेच हेवेदावे केले जातात. पाकिस्तानच्या संघात गुणवत्ता आणि कामगिरी या गोष्टींपेक्षाही काही गोष्टींना महत्त्व दिलं जातं. या गोष्टींसाठी पाकिस्तानचे खेळाडू हाणामारी करायलाही तयार असतात.”
” पाकिस्तानच्या संघात जे खेळाडू मुस्लीम होते, त्यांच्यावर अन्याय केला गेला. युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. तो देवाची देणगीच होता. पण ही देणगी पाकिस्तानच्या संघाला चांगल्यापद्धतीने सांभाळता आली नाही. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला.”
” पाकिस्तानच्या संघात हिंदू खेळाडू होता. तो हिंदू आहे म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघाला बऱ्याच विकेट्स मिळवून दिल्या. सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या, पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंची आग मस्तकात जायची. त्या हिंदू खेळाडूला मारण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूची कारकिर्द अल्पावधीतच आटोपली, नाहीतर त्याने जास्त काळ संघाची सेवा केली असती. हा हिंदू खेळाडू होता दानिश कनेरिया.”
यावरून असंच लक्षात येत की फक्त सामानंय लोकांमध्येच नाही तर, आता एखाद्या कलाकाराला ,खेळाडूला त्यांच्या गुणवत्तेवरून किंवा त्यांच्या कौशल्यावरून नाही तर, त्यांचे त्यांच्या धर्मावरून परिक्षण केलं जाणारं का ? हाच मोठा प्रश्न आहे …