तिने पाठवलं रक्ताने लिहिलेलं पत्र; ‘मला द्यायचीये निर्भयाच्या दोषींना फाशी’,
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/VARTIKA-Frame-copy.jpg)
महाईन्यूज | दिल्ली
सात वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरतच आहे. आता आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं असून निर्भयाच्या दोषींना एखाद्या महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी अशी मागणी तिने केलेली आहे.
वर्तिका सिंहने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निर्भयाच्या चारही दोषींना महिलेच्या हातून फाशी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे केलेली आहे. विशेष म्हणजे हे पत्र तिने रक्ताने लिहिलेलं आहे. “निर्भयाच्या दोषींना माझ्या हातून फाशी दिली गेलीच पाहिजे. त्यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते असा संदेशा संपूर्ण देशभरात जाईल व महिला कलाकार आणि खासदारांनी माझं समर्थन करावं, यामुळे समाजात बदल घडेल अशी अपेक्षा आहे”, अशा आशयाचं पत्र वर्तिकाने लिहिलेल आहे.