आयसीसी महिला टी -20 विश्वचषक : भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरच्या हाती
नवी दिल्ली । महाईन्यूज
ऑस्ट्रेलियात होणा-या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कप सुरू होणार आहे.
भारतीय संघात बंगालची फलंदाज रिचा घोष एकमेवर नवीन चेहरा आहे. हरियाणाची 15 वर्षाची शेफाली वर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चांगल्या कामगिरीनंतर तिची पहिली जागतिक स्पर्धा खेळण्यास सज्ज झाली आहे.
भारतीय संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, ऋचा घोष, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्ड यांचा समावेश आहे.
रिचा घोषला नुकतीच महिला चॅलेन्जर ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. तिच्या 26 चेंडूत 36 धावांच्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. त्या खेळीदरम्यान तिने एक षटकारही लगावला.