breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मुंबईत ठाकरे गटाचा भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय’; मनसे नेत्याचा खोचक टोला

मुंबई | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात ३० जागा मिळाल्या आहेत. महायुतीला केवळ १७ जागा मिळू शकल्या आहेत. तर विशाल पाटील सांगलीतून अपक्ष म्हणून निवडूण आले आहेत. मुंबईतही उबाठा गटाने जोरदार कामगिरी केली असून चार पैकी तीन जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन पैकी एका जागेवर विजय मिळविला आहे. मुंबईतील झालेला हा पराभव महायुती आणि मनसेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संदीप देशपांडे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. उ.बा.ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या, त्या त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला, असा दावा मनसेचे दुसरे नेते गजानन काळे यांनी केला होता.

हेही वाचा    –      राज्यातील भाजपच्या ३ केंद्रीय मंत्र्यांचा दारूण पराभव 

https://x.com/SandeepDadarMNS/status

शिवसेना उबाठा गटाला जागावाटपात २१ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांनी ९ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसने १७ जागांपैकी १३ जागांवर घसघशीत यश मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने १० पैकी ८ जागांवर जोरदार विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचे दिसले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button