RBI ने २००० रूपयांच्या नोटा वितरणातून काढल्या, राज ठाकरे म्हणाले..
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ने २००० रूपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी या नोटा बँकेत जमा कराव्या असे RBI ने म्हटलं आहे. दरम्यान, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मी नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केलं होतं. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नव्हतं.
हेही वाचा – पंतप्रधान आवास योजनेची सोडत प्रक्रिया तात्काळ राबवा!
हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत. मी या गोष्टी तेव्हाच बोललो होतो. मला जे प्रश्न विचारले जातात ते सरकारमधील लोक आल्यावर विचारले जात नाही. केव्हा तोंड बंद असतं. मला हे प्रश्न विचारा म्हणून पत्रकारांना कुणी पाठवतं का?, असंही राज ठाकरे म्हणाले.