TOP Newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

मुंबई, ठाण्याला हुडहुडी.. ; यंदाच्या हिवाळय़ातील नीचांकी तापमान

उत्तरेकडून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागांत दोन दिवसांपर्यंत पावसाळी स्थिती होती.

मुंबई, पुणे : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत तर सोमवारी यंदाच्या हिवाळय़ातील नीचांकी तापमानाची नोंद झाली़ त्यामुळे मोठय़ा प्रतीक्षेनंतर मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी थंडीचा अनुभव घेतला.प्रामुख्याने मुंबई परिसर आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा घसरल्याने या भागाला हुडहुडी भरली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागांत दोन दिवसांपर्यंत पावसाळी स्थिती होती. सध्या बहुतांश भागात कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. तुरळक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ आहे. सध्या गुजरात आणि मध्य प्रदेशात अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. या भागांतून वारे येत असल्याने राज्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. सोमवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जळगावात ९ अंश किमान तापमान नोंदविले गेले. मुंबई आणि परिसरासह सर्व कोकण विभागातही तापमानात मोठी घट झाली आहे. दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊन चांगलाच गारवा अवतरला आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, नगर आदी भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळ येऊन रात्रीचा गारवा वाढला आहे. मरावाडय़ातही तापमानात घट झाली आहे. ११ ते १५ या कालावधीत उत्तरेकडील काही राज्यांत थंडीच्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यातील तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

विदर्भात पावसाळी वातावरण कायम

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले असतानाच, सोमवारी बऱ्याच जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली. मात्र, पावसाळी वातावरण कायम होत़े चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारीदेखील सकाळच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस झाला. दुपारनंतर हा पाऊस कमी झाला.

मुंबईत सरासरीपेक्षा ४.४ अंशांनी उणे तापमान

’मुंबई आणि परिसरात सध्या रात्री आणि दिवसाही गारवा जाणवतो आहे. दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे.

’मुंबईच्या कुलाबा केंद्रावर १५.२ अंश किमान, तर २५.७ अंश कमाल तापमान नोंदविले गेले.

’किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४.४ अंशांनी, तर कमाल तापमान ४.८ अंशांनी कमी आहे.

’सांताक्रुझ केंद्रावर १३.२ अंश किमान, तर २५.१ अंश कमाल तापमान होते. ते अनुक्रमे ४.३

आणि ६.१ अंशांनी सरासरीच्या तुलनेत कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button