‘वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या’; शरद पवारांची टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-99-780x470.jpg)
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते का मला माहित नाही, हा निवडणूक आयोगाला हा प्रश्न असल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार यांनी आज सांगितले की 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यांवरून वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना मांडली. याचा अर्थ सगळ्या निवडणुका एकाच वेळी व्हायला हव्यात असा त्यांचा आग्रह होता. मात्र, दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. ते म्हणाले की याचा अर्थ असाच आहे की त्यांना फारच महत्त्व द्यायचे कारण नाही. पंतप्रधान बोलतात एक आणि यंत्रणा दुसराच निर्णय घेते याची प्रचिती आल्याचे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा – बारामतीतून लढण्यास मला रस नाही; अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले..
दरम्यान लडकी बहीण योजनेवरून बोलताना शरद पवार यांनी लाडक्या बहिणीचा विषया फक्त आपल्या राज्यातील आहे इतर चार राज्यांमधील हा विषय नसल्याचे सांगितले. सरकारकडून छोट्या योजना राबवले जात आहेत त्यासाठी तरतूद नसल्याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यासंबंधी भूमिका मांडतील असेही ते म्हणाले.
नवाब मलिक यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सोशल मीडियावर घड्याळ चिन्हाचा वापर सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलं असता ते म्हणाले की बघूया आता पुढे काय होते असं म्हणत त्यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अजित पवारांच्या बारामतीमधून निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेवर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की त्यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना अनुकूल वातावरण असेल तिथून ते लढतील. त्यांच्या मनात नक्की काय आहे हे मला माहीत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.