breaking-newsताज्या घडामोडीपुणे
हा तर शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रकार- राष्ट्रवादी कॉंग्रेस
![कांद्याने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले, सरकारचं १३ वं घालावं का ? राजू शेट्टींची टीका](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Kanda.jpg)
पुणे: शेतकऱ्याला चार पैसै मिळत असताना अचाकन कांदा नर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रकार चाललेलाय. कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावी. शेतकऱ्याला तोटा होईल असा निर्णय घेऊन केंद्र सरकार हे शेतकऱ्याला परावलंबी बनविण्याचे धोरण राबवत आहे. आगोदरच 60% कांदा खराब झालेला आहे. केंद्र सरकारने आता त्यात अधिक भर घालू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिलेली आहे.